अहमदनगर :- शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे घेतील. आम्ही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत तयारी केली आहे.
ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांचा अहवाल प्रदेशला पाठवण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी बुधवारी दिली.

भाजप इच्छुकांच्या मुलाखती आंबटकर यांनी घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रकाश चित्ते, प्रसाद ढोकरीकर या वेळी उपस्थित होते. आंबटकर म्हणाले, भाजप-सेनेची युती २५ वर्षांपासून आहे.
या निवडणुकीत युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शहा व शिवसेनेचे उध्दव ठाकरे घेतील. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आंबटकर म्हणाले, रोहित आता आले आहेत. त्यांना राजकारण माहीत नाही.
आवश्यकता वाटली तेथे आम्ही प्रवेश दिले आहेत. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कोअर कमिटीची बैठक झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बेरड यांनी दिली. विद्यमान सर्व आमदारांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेबरोबर युतीसंदर्भातील निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे.
मात्र, आम्ही जिल्ह्यातील बाराही जागांची तयारी केली आहे. या बैठकीला खासदार सुजय विखे, सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, चार सरचिटणीसांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या? निवडणुकीची तयारी कशी करायची? यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
- महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास
- नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
- देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी! वाचा काय बदल होणार?
- जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत
- महाराष्ट्रालाही टाकलं मागे! भारतातील ‘हे’ राज्य आहे सर्वात हुशार, येथील प्रत्येक विद्यार्थी आहे स्मार्ट; IQ लेव्हल ऐकून तर थक्क व्हाल