अहमदनगर :- शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे घेतील. आम्ही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत तयारी केली आहे.
ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांचा अहवाल प्रदेशला पाठवण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी बुधवारी दिली.

भाजप इच्छुकांच्या मुलाखती आंबटकर यांनी घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रकाश चित्ते, प्रसाद ढोकरीकर या वेळी उपस्थित होते. आंबटकर म्हणाले, भाजप-सेनेची युती २५ वर्षांपासून आहे.
या निवडणुकीत युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शहा व शिवसेनेचे उध्दव ठाकरे घेतील. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आंबटकर म्हणाले, रोहित आता आले आहेत. त्यांना राजकारण माहीत नाही.
आवश्यकता वाटली तेथे आम्ही प्रवेश दिले आहेत. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कोअर कमिटीची बैठक झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बेरड यांनी दिली. विद्यमान सर्व आमदारांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेबरोबर युतीसंदर्भातील निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे.
मात्र, आम्ही जिल्ह्यातील बाराही जागांची तयारी केली आहे. या बैठकीला खासदार सुजय विखे, सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, चार सरचिटणीसांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या? निवडणुकीची तयारी कशी करायची? यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
- जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?
- जर्मनी, फ्रान्सनंतर आता भारतातही धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन! जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये
- अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा खंड, श्रावणातही पावसाने फिरवली पाठ, शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत
- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांमध्ये पहिली ते दहावीचे शिक्षण पूर्णपणे मोफत ! गणवेश, रेनकोट, पाठ्यपुस्तकांसहित सार काही मिळणार मोफत
- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जिल्हा परिषद फवारणी ड्रोन खरेदी करण्यासाठी देणार ५ लाखांचे अर्थसहाय्य