मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.
याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले.
तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.
- Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 248 किमीच्या जबरदस्त रेंजसह लाँच – किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
- 2025 Kia Seltos आता आणखी स्वस्त ! दमदार इंजिन, जबरदस्त मायलेज आणि अधिक फीचर्स
- 34km मायलेज देणारी मारुती कार फक्त दोन लाखांत मिळणार जाणून घ्या ऑफर
- ब्लॅक लुकमध्ये आली नवी स्कॉर्पिओ एन कार्बन एडिशन – किंमत, फीचर्स आणि इंजिनबाबत संपूर्ण माहिती
- Tata Punch EMI Plan : फक्त 1 लाख रुपयांत घरी आणा टाटा पंच ! पहा पूर्ण फायनान्स प्लॅन