मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.
याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले.
तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?