अहमदनगर :- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे.

आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत.
पुत्र सुजय विखे यांना लोकसभेचे तिकीट न दिल्यानंतर झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपासून विखे आणि कॉंग्रेस पक्षामध्ये काहीशी फुट पडली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळविला होता.
दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.
- Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत चार लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…
- ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल; एका महिन्यात 135% रिटर्न!
- कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्ष काम केलं असेल आणि शेवटचा पगार 35,000 असेल तर किती ग्रॅच्युइटी मिळेल ?
- Tata समूहाचा ‘हा’ स्टॉक 4 हजार रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत 95 लाख शेअर्स
- मारुती एस-प्रेसो आता आणखी महाग ! किंमतीत झाली इतकी वाढ