राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.
भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, नंतर हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.

ट्रॅक्टर माघारी आणण्यासाठी भारतने उसनवार करून पैसे जमवले. मात्र, या ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याने भारतचे प्रयत्न निष्फळ ठरले. नैराश्य आलेल्या भारतने घरातील आढ्याला गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.
भारतचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. कर्जाचा हप्ता थकल्याने ट्रॅक्टरचा झाला लिलाव काम न मिळाल्याने अडचणींत पडली भर भारत गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता.
मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी जुगाड मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही.
- सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2026 मध्ये 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? तज्ञ सांगतात…
- बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता धुरंधर चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ! कधी रिलीज होणार चित्रपट?
- दरमहा 5,500 रुपयांची कमाई करायची आहे का ? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा
- 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता इतका वाढणार
- 11 तासांचा प्रवास फक्त 4 तासात…. 35,000 कोटी रुपये खर्च, महाराष्ट्रात तयार होणार 442 KM लांबीचा नवीन एक्सप्रेस वे, मुख्यमंत्र्यांची मंजुरी













