राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.
भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, नंतर हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.

ट्रॅक्टर माघारी आणण्यासाठी भारतने उसनवार करून पैसे जमवले. मात्र, या ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याने भारतचे प्रयत्न निष्फळ ठरले. नैराश्य आलेल्या भारतने घरातील आढ्याला गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.
भारतचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. कर्जाचा हप्ता थकल्याने ट्रॅक्टरचा झाला लिलाव काम न मिळाल्याने अडचणींत पडली भर भारत गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता.
मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी जुगाड मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही.
- Car Parking Rule: पार्किंग दाखवा तरच गाडी घ्या… काय आहे महाराष्ट्रातला नवा कायदा? वाचा
- Post Office Scheme: म्हातारपणाची काठी आहे ‘ही’ योजना; रोज फक्त 50 रुपये भरा आणि 35 लाख मिळवा
- पंतप्रधान आवास योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत आहे नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी!
- Business Ideas: स्वतःच्या पायावर उभं राहयचंय? फक्त 5000 रुपयांत सुरु करा ‘हे’ 5 उद्योग; मिळेल पैसाच पैसा
- अवकाळी पावसाचा अहिल्यानगरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, साठवलेला कांदा खराब होण्याची भीती