अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे,
शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अड. अभय आगरकर, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते उपस्थित होते.
- महिन्याचा पगार 1 लाख रुपये असेल तर कोणती SUV कार ठरणार बेस्ट ? 4 पर्याय जाणून घ्या
- दिवसा वडापावच्या गाडीवर काम, रात्री शाळा करत ४७ व्या वर्षी अहिल्यानगरच्या मंगला बोरुडे झाल्या दहावी पास
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! २३४ हेक्टर पिकांचे नुकसान तर ४८१ शेतकऱ्यांना बसला फटका
- संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण! कोणाची गुलामगिरी स्विकारू नका एकजुटीने लढा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
- निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण थांबवा, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार- डाॅ. सुजय विखे