अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात कांद्याचे भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशांतर्गत बाजारात दिलासा मिळाल्यानंतर आयात कांदा सडू लागला आहे.
मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट(जेएनपीटी)वर बाहेरून आयात केलेला सात हजार टन कांदा सडत आहे. ज्या किमतीवर कांदा आयात केला तो देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या भावापेक्षा जास्त आहे.

अशा स्थितीत आयातदार आपला माल खाली करण्यासाठी जास्त घाई करत नाहीत. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, एका महिन्यापासून २५० रेफ्रिजरेटेड कंटेनर्समध्ये ठेवलेला ७००० टन आयात कांदा सडत असल्याने दुर्गंध येत आहे.
व्यापारी सूत्रांनुसार, आयात कांद्याच्या किमती ४५ रुपये प्रतिकिलोच्या हिशेबाने आहेत, ठोक बाजारातील किमती खूप कोसळल्या आहेत. मॉडेल प्राइस सध्या २३ रु. प्रतिकिलो आहे. परिणामी आयातदार आपला माल काढण्यास विलंब करत आहेत.