राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती दोन कोटी, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते दहा लाख, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती 75 लाख, आढाववाडी अंतर्गत रस्ते 7 लाख, मेहेर बाबा फाटा रस्ता दुरुस्ती लाख आदी विकास कामाचा प्रारंभ आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजीराव गवारे, संभाजी पवार, सरपंच सुभाष झिने, प्रा. देवराम शिंदे, माजी सरपंच संतोष झिने, एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, इंद्रभान कदम, सागर गुंड, नानासाहेब झिने आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही, ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. त्यामुळे नगर-राहुरी-पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे.
बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र, आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस वर्षांचा निधी पाच वर्षांत भाजप सरकार मुळे मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, पहा..
- अहिल्यानगरमधील एमआयडीसीमधील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावावा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
- अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे ॲक्शन मोडवर
- कर्जतमध्ये सोन्याची बिस्कीट बनवून देतो म्हणत वृद्ध महिलेल्या गंडवणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड
- अहिल्यानगर शहरात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे तगडे नियोजन, तब्बल १००० हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त