मुंबई – सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात 54 सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा विभागवार मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

29 ते 31 जुलैदरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वीच जिल्हावार पार पडल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून सुमारे 1100 अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा समित्यांनी मुलाखतींचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.
- डोंबिवली ते हिमाचल प्रदेश…भारतातील ‘ही’ 6 रेल्वे स्थानके खरंच भुताने पछाडलेली?, प्रवासी आजही पाय ठेवायलाही थरथरतात!
- भारतात कोणत्या राज्यात धावतात सर्वाधिक ट्रेन, कमाईच्या बाबतीत कोण देतं सर्वाधिक उत्पन्न? वाचा स्पेशल रिपोर्ट!
- एखादं गाव वसवता येईल इतकं मोठं…’हे’ आहे भारताचं सर्वात मोठं विमानतळ! पाहा खास वैशिष्ट्यं
- मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!
- संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय