22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला.

ते म्हणाले, बबनराव पाचपुते हे आज भाजपमध्ये आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
भाजपसाठी त्यावेळी ते ‘बबन्या’ होते. मात्र पाचपुते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप राज्यात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे.
त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार 10 हजार 440 रुपयांची वाढ
- पुढील वर्षी 10वी आणि 12वी ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय !
- Explained : नेवाशात लंघे-मुरकुटे युती ? गडाखांच्या डोक्याला ताप ! मतदारसंघच उरला नाही…
- SBI कडून 30 वर्षांसाठी 35 लाखांचे Home Loan घेतल्यास किती EMI भरावा लागणार ? वाचा…
- महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? नवीन तारीख पहा…