22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला.

ते म्हणाले, बबनराव पाचपुते हे आज भाजपमध्ये आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
भाजपसाठी त्यावेळी ते ‘बबन्या’ होते. मात्र पाचपुते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप राज्यात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे.
त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
- आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, UPI नेच जमा करता येईल पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!
- IBPS PO Jobs 2025: IBPS अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाची मेगा भरती सुरू; तब्बल 5208 जागांसाठी भरती सुरू
- मशरूम शाकाहारी आहे की मांसाहारी?, खरं उत्तर ऐकून धक्का बसेल!
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- व्यक्तीच्या तळहातावरील रेषा सांगतात त्यांचे गुपित व्यक्तिमत्व, ‘या’ चिन्हांवरून ओळखा गुण आणि दोष!