नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.
माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

गडाख अलीकडेच आजारपणातून सावरले आहेत. त्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी सभा होती. त्यामध्ये त्यांचे आक्रमक रूप पहायला मिळाले.
सोनई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा मेळावा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांचे चिरंजीव माजी आमदार शंकराव गडाख यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला.

यावेळीही गडाख कोणत्यात पक्षात न जाता आपल्या शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फेच निवडणूक लढविणार आहेत.
त्यानंतर ज्या पक्षाची सत्ता येईल, त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणाही या मेळाव्यात करण्यात आली.
तालुक्यात पाण्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक पिके जळून गेली, जर पाऊस आला नसता, तर काय अवस्था झाली असती.
आपलं पाणी खाली चालले आहे आता तर सुमारे २ टीएमसी पाणी बीडला देण्याचा निर्णय झाला आहे. यावर तालुक्याचा आमदार काही बोलत नाही.
शंकरराव आमदार असताना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी व अकोले तालुक्यात धरणे बांधली जात असताना आपल्याच सरकारचे ज्येष्ठ मंत्री पिचड यांच्याशी वाईटपणा घेतला.
आगामी निवडणुकीत पाणीप्रश्नांवर लढणाऱ्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













