नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.

आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?
यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.
- महाराष्ट्रातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हा’ छोटासा नियम पाळला नाही तर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार
- EMI वर मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी आरबीआय नवा नियम आणणार ! आता हफ्ता भरला नाही तर…
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 16 कोचवाली वंदे भारत एक्सप्रेस
- नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींसाठी Good News ! मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
- पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास किमती किती रुपयांनी कमी होणार ? एक लिटर पेट्रोलसाठी फक्त ‘इतके’ पैसे मोजावे लागणार