मुंबई :- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात १३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपदाला सतीश तळेकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
त्यांना दिलेले मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचा दावा याचिकेत केला आहे. १३ नव्या मंत्र्यांत तिघे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत.

विखे, क्षीरसागरांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, महातेकर कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते.
दरम्यान, उच्च न्यायालयाचे न्या. धर्माधिकारी व न्या. पटेल यांनी ही राजकीय याचिका असल्याने वाद राजकीय पद्धतीनेच लढायला हवेत,’ असे मत मांडले. सोमवारी पुढील सुनावणी होत आहे.
(एका नियमबाह्य फायद्याच्या मोबदल्यात दुसरा बेकायदेशीर व अनैतिक फायदा करून देणे म्हणजे qui-pro-quo).विखे व क्षीरसागरांचे मंत्रिपद चालू कार्यकाळासाठी आहे.
म्हणजे आमदार होण्याचा कालावधी ६ महिने नसून साडे तीन महिने आहेत. त्यात किमान १ महिना आचार संहिता असते. ६ महिन्यापेक्षा कमी काळ असल्याने विधानसभेची पोटनिवडणूक होत नाही. त्यामुळे उर्वरित तिघे निवडून येऊ शकणार नाहीत.
पुढे स्थानिक स्वराज्य ची निवडणूक आहे. परंतु, तिथे यांना संधी मिळेलच हे निश्चित नाही; तशी शक्यताही नाही, असे नमूद करून ‘क्विड-प्रो-को’ यात सिद्ध होत असल्याचे सराटे यांचे म्हणणे आहे.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी