संगमनेर :- राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे यांची वर्णी लागताच विखे समर्थक आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांच्या निवडीचे रविवारी स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील वाढता संघर्ष, विरोधी पक्षनेते आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा, भाजप प्रवेश अशा घडामोडीत विखे राज्यात केंद्रस्थानी होते.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचे काम केल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रीपद निश्चित मानले जात होते.
अपेक्षेप्रमाणे रविवारी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. शनिवारीच विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले होते, तसा निरोपदेखील त्यांना आला होता.
नगरमधून विखेंचा मंत्रीमंडळात समावेश निश्चित झाल्याने संगमनेरमधून विखे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, जयवंत पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा केसेकर, योगेश बिचकर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,
शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, डॉ. सोमनाथ कानवडे आदीं उपस्थित होते.
त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तालुक्यातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचा समर्थकांचा विश्वास आहे. विखेंच्या अडचणीच्या काळातदेखील संगमनेरकरांनी त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली.
- तिरुपती बालाजी मंदिरात दान करण्यात आलेल्या मोबाईलचा लिलाव होणार ! 4 आणि 5 ऑगस्टला ऑनलाईन लिलाव होणार
- भारतातील टॉप 10 भ्रष्ट सरकारी विभाग कोणते ? सर्वाधिक भ्रष्ट सरकारी खात्याचे नाव आहे शॉकिंग
- दररोज 37,000 रुपयांचे कमिशन ! पेट्रोल-डिझेल विक्रीतून व्हाल मालामाल, पेट्रोल पंपाचे लायसन्स कस मिळत, किती पैसे लागतात?
- वास्तु दोष, वाईट नजर आणि अपयश सगळं काही दूर होईल! ‘हा’ वास्तू उपाय एकदा करून बघाच
- Post Office ची MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी ठरणार वरदान ! 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?