संगमनेर :- राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे यांची वर्णी लागताच विखे समर्थक आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांच्या निवडीचे रविवारी स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील वाढता संघर्ष, विरोधी पक्षनेते आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा, भाजप प्रवेश अशा घडामोडीत विखे राज्यात केंद्रस्थानी होते.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचे काम केल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रीपद निश्चित मानले जात होते.
अपेक्षेप्रमाणे रविवारी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. शनिवारीच विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले होते, तसा निरोपदेखील त्यांना आला होता.
नगरमधून विखेंचा मंत्रीमंडळात समावेश निश्चित झाल्याने संगमनेरमधून विखे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, जयवंत पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा केसेकर, योगेश बिचकर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,
शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, डॉ. सोमनाथ कानवडे आदीं उपस्थित होते.
त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तालुक्यातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचा समर्थकांचा विश्वास आहे. विखेंच्या अडचणीच्या काळातदेखील संगमनेरकरांनी त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली.
- शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
- सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण
- एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळणार डबल बोनस
- पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार लखपती ! 5 वर्षात मिळणार 5 लाखांचे व्याज, कोणाला करता येणार गुंतवणूक?













