अहमदनगर : नगर शहराचे आमदार असलो, तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले.
नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आपण शासनाकडून मंजूर करून आणली असून त्यासाठी सुमारे १५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.

यातील काही रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी,
असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे विरोधी उमेदवार तसेच शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.
नगर तालुक्यातील निंबळक व देहरे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जगताप म्हणाले, नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला व उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.
यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.
- राज्यात हवामान अस्थिर; थंडी ओसरतेय, ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा इशारा
- अर्ज मुदतवाढीची शक्यता, जागांमध्ये वाढ; एमपीएससी राज्य सेवा 2026 उमेदवारांसाठी मोठी संधी
- कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट 7-सीटर! Renault Triber Facelift ठरतेय सर्वात स्वस्त आणि सुरक्षित पर्याय
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नाशिक परिक्रमा’ रिंग रोडला गती; रस्त्याची रचना, उंची व शेतकऱ्यांच्या शंकांचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
- पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता लवकरच! शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती













