अहमदनगर : नगर शहराचे आमदार असलो, तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले.
नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आपण शासनाकडून मंजूर करून आणली असून त्यासाठी सुमारे १५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.

यातील काही रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी,
असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे विरोधी उमेदवार तसेच शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.
नगर तालुक्यातील निंबळक व देहरे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जगताप म्हणाले, नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला व उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.
यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.
- Ahilyanagar News दहशतवादी हल्ल्यानंतर अहिल्यानगरमधील अनेक पर्यटकांनी काश्मीरच्या सहली केल्या रद्द
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! 6,500 कोटी रुपयांच्या ‘या’ रोड प्रोजेक्टला मिळाली कॅबिनेटची मंजुरी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प ?
- काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात सर्वतोपरी मदतीची ग्वाही
- वडिलोपार्जित संपत्ती विकण्यासाठी कोणाची परमिशन घ्यावी लागते ? वाचा….
- मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला ;