जामखेड :- असंघटित कामगारांकरिता राज्यात काही ठिकाणी कामगार कल्याण मंडळाकडून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे.
ही व घरकुल योजना लवकरच नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याण मंत्री संजय भेगडे यांनी रविवारी केली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना २९ कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम चौंडीत झाला. यावेळी भेगडे बोलत होते.
भेगडे म्हणाले, कर्जत व जामखेड तालुक्यात आतापर्यंत तीन हजार कामगारांनी नोंदणी केली आहे. तीनशे कामगारांचे लाभार्थी म्हणून फॉर्म भरले आहेत. त्यांच्या खात्यावर पाच हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे.
राज्यात २०१४ पूर्वी फक्त ७० हजार कामगारांची नोंदणी होती, आता १८ लाख ७५ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांचा अपघाती मृत्यू झाला, तर कुटुंबाला पाच लाख व नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये देण्यात येतात.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, कर्जत-जामखेडमधील २० हजार कामगारांची नोंदणी करायची आहे. आतापर्यंत तीन हजारांची नोंदणी झाली आहे. आपला भाग दुष्काळी असल्याने कामगारांना या योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम आपण करणार आहोत.
यावेळी बोलताना मंत्री भेगडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये पार्थ पवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतदेखील कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पुण्याला पाठवा…
- महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास
- नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
- देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी! वाचा काय बदल होणार?
- जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत
- महाराष्ट्रालाही टाकलं मागे! भारतातील ‘हे’ राज्य आहे सर्वात हुशार, येथील प्रत्येक विद्यार्थी आहे स्मार्ट; IQ लेव्हल ऐकून तर थक्क व्हाल