श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा
- ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीवर सरकारची भूमिका स्पष्ट; ७,५०० रुपयांचा प्रस्ताव नसल्याचे राज्यसभेत जाहीर
- STT वाढीच्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरला; मात्र गुंतवणूकदार अजूनही सावध













