श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे साईभक्त त्रस्त, एवढ्या मोठ्या शहराची जबाबदारी फक्त १३ कर्मचाऱ्यांवर
- कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक जाहीर, बंडखोरांमध्येच नगराध्यक्षासाठी रस्सीखेच!
- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी ! पण शिक्षकांना मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत शाळेत यावे लागणार
- अहिल्यानगरमधील ‘या’ ५४ ग्रामपंचायतीचा महिला चालवणार कारभार, तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर
- सोन्याच्या किमती लाखाच्या उंबरठ्यावर, लग्नकार्य, सण-उत्सव कसे करायचे सर्वसामान्यांना पडला प्रश्न?