अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- महाराष्ट्रातील हवामानात उच्च उत्पादन देणाऱ्या कलिंगडच्या टॉप 5 जाती ! 2025-2026 मध्ये लागवडीसाठी उपयुक्त
- पुण्यातील दुसऱ्या Ring Road प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! ‘या’ ७ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार बांधकाम, वाचा सविस्तर
- महिन्याचा पगार इतका असेल तरच मिळणार 30 लाखांचे Home Loan ! SBI कडून होम लोन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे
- आठवा वेतन आयोग सरकारी नोकरीचे स्वरूप बदलणार ! पगार ठरवण्याची पद्धत बदलणार, खाजगी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार वेतन, सरकारचा प्लॅन पहा…
- आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन वाद ! ‘या’ कर्मचाऱ्यांना नव्या आयोगाचा लाभ मिळणार नाही ?