अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- Ahilyanagar News दहशतवादी हल्ल्यानंतर अहिल्यानगरमधील अनेक पर्यटकांनी काश्मीरच्या सहली केल्या रद्द
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! 6,500 कोटी रुपयांच्या ‘या’ रोड प्रोजेक्टला मिळाली कॅबिनेटची मंजुरी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प ?
- काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात सर्वतोपरी मदतीची ग्वाही
- वडिलोपार्जित संपत्ती विकण्यासाठी कोणाची परमिशन घ्यावी लागते ? वाचा….
- मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला ;