संगमनेर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या,
तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळे वागतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केली.

थोरात म्हणाले, विखे भाजपत जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. तथापि, राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळं वागतील असं मला वाटत नाही.
सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र, यावेळची निवडणूक विचारधारेची असल्याने आपसांतील मतभेद विसरले पाहिजेत.
भाजप सरकार घालवण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे थोरात म्हणाले.
- पाकिस्तानमध्ये भारतासाठी कोणते नाव वापरले जाते?, सत्य जाणून हैराण व्हाल!
- तिकीट बुकिंगपासून वेटिंगपर्यंत…रेल्वेने बदलले 4 मोठे नियम! आत्ताच जाणून घ्या, अन्यथा नुकसान तुमचंच
- Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धासाठी भारताला किती खर्च आला?, सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले? आकडे ऐकून धक्का बसेल!
- थायलंड-कंबोडियात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार कसा झाला?, आज 90% लोक आहेत बौद्ध धर्माचे अनुयायी!
- जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?