अहमदनगर :- विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. अनेकांना वाटते की आपण प्रयत्न करावेत,
यासाठी गोरगरीब जनतेसाठी काही कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याला मोठी प्रसिध्दी मिळत आहे.
मात्र राम शिंदे यांनी त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने गोरगरीबांचे कामे गेल्या पाच वर्षांमध्ये केली आहेत, अशी पवार यांचे नाव न घेता श्री विखे यांनी टीका केली.

पालकमंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथे केले.
कर्जत येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उदघाटन पालकमंत्री प्रा. राम शिदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंबांचे नाव न घेता टीका केली.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, जिल्हयामध्ये सर्वात जास्त निधी राम शिंदे यांनी कर्जत -जामखेड तालुक्यांना आणला.
तरीही मला मात्र मोठी आघाडी का मिळाली नाही याचे कोडे पडले आहे. हा जनतेचा दोष नाही. जे केले ते जनतेपर्यंत पोहचवले नाही.
राम शिंदे हे प्रसिध्दीमध्ये कमी पडले आणि त्याचा फटका बसला आहे, असे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.
आपण जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ही योजना राबवीणार आहोत. याची सुरवात कर्जत तालुक्यापासून करणार आहोत.
यामध्ये गोरगरीब नागरीकांना त्यांच्या घरपोच रेशनकार्ड आणि डोलचे पैसे देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- ‘हे’ 4 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का ? मग तुम्हाला मिळणार 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना आजपासून खुला होणाऱ्या आयपीओमधून कमाईची सुवर्णसंधी ! 23 रुपयांचा शेअर थेट 35 रुपयांवर जाण्याची शक्यता
- सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ‘इतकी’ वाढ करणार, काय सांगतो नवा रिपोर्ट
- शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय
- PF कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता BHIM UPI द्वारे एका क्लिकवर खात्यात पैसे जमा होणार, कशी असणार प्रोसेस?













