संगमनेर :- मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मंत्रिपद स्वीकारण्यास मी तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याने भाजप प्रवेश केवळ औपचारिकता राहिल्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सांगितले.

काँग्रेस नेत्यांनी आता स्वत:हून बाजूला होत नव्यांना संधी देण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता अंगुलीनिर्देश केला.
एका खासगी कार्यक्रमासाठी संगमनेरमध्ये आलेले विखे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारात मिळणाऱ्या संभाव्य पदाबाबत छेडले असते ते म्हणाले,
माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दिवस कोणता असेल आणि कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.
काही दिवसांपूर्वीच आपण विराेधी पक्षनेतेपदाचा आणि आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पक्षात आपली कोंडी केली, तेथे आपली घुसमट होत होती, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
- बोनस शेअरची कमाल ! १ वर २ शेअर्स फ्री तुमच्याकडे आहे का हा शेअर
- अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ ! जाणून घ्या कांदा बाजारभाव अपडेट
- GK 2025 : एकदा लग्नगाठ बांधली की जीवनभर निभवावीच लागेल! ‘या’ देशांमध्ये घटस्फोट घेणे जवळपास अशक्य, कारण काय?
- Most Expensive Fruits: फक्त श्रीमंत लोकच खरेदी करू शकतात ‘ही’ फळे, काहींची किंमत तर लाखांच्याही पार! पाहा जगातील 10 सर्वात महागडी फळे
- टाटा हॅरियर EV बेस व्हेरियंट : फीचर्स, रेंज आणि किंमत काय मिळेल आणि काय नाही ?