राहुरी :- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला लाभला नाही, असे सांगत निळवंडे कालव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ही जनादेश यात्रा असली, तरी जनतेने आभार यात्रा म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी केले.
मी आमदार कर्डिंलेचे नाव कायम घेत असताना माझे नाव घेण्याची आठवण त्यांना करून द्या, असा टोला डॉ. विखे यांनी मारताच बैठकीत हास्यकल्लोळ झाला. महाजनादेश यात्रा २५ ला दुपारी राहुरीत येत असून तिच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत डॉ. विखे बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते. विखे व कर्डिले एकाच वाहनातून आल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. डॉ. विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर कर्डिले व माझ्याबाबत चर्चेला उधाण आले. अनेकांनी विपर्यास केला.
तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय करणार असा सवाल काहींनी केला. जो माणूस गेली अनेक वर्षे जनतेत आहे, त्यांना जनता निवडून देणारच आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुका लढवू नका. राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील.
- ईव्ही प्रेमींना खुशखबर? केंद्रीय अर्थसंकल्पातील ५ मोठे निर्णय जे तुमचा खर्च कमी करतील!
- एवढ्या स्वस्तात 7-सीटर? ग्राहकांची झुंबड, रेनॉल्टच्या विक्रीत ऐतिहासिक वाढ
- AI स्वतःच पोस्ट करतं, भांडतं आणि निर्णय घेतं – सोशल मीडियाचं भवितव्य बदलणार?
- सोशल मीडिया ताब्यात AI? ‘मानव संपणार’ दाव्यांनी इंटरनेट हादरलं
- वारंवार रिटर्न करता? सावध व्हा! Amazon थेट खाते सस्पेंड करू शकते













