संगमनेर :- काँग्रेसला व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना? असा खोचक सवाल गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केला.
‘वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना कामं करणारी माणसं हवी आहेत.

आंभोरे येथे युती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
निळवंडे प्रश्नांवर बोलताना विखे म्हणाले, ‘निळवंडे कालव्यांची कामे सुरू झाल्याने लोकांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला.
पिचडांच्या सहकार्याने सुरू झालेली कालव्यांची कामे पूर्ण करून दीड वर्षात उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी देण्याचे सरकारचे धोरण आहे. यासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे.
सामान्य माणसासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेचे भक्कम पाठबळ सरकारला आहे. राज्यात काँग्रेसचे आमदारच निवडून नाहीत, अशी परिस्थिती असेल तर, तर या तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून देऊन उपयोग काय?
युतीचा आमदार निवडून गेला तरच पंचवीस वर्षे प्रलंबित कामे मार्गी लागतील. त्यामुळे युतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा प्रश्न सोडविण्याची हमी मी घेतो.’
- ताजमहालमधील ‘ते’ 22 दरवाजे अजूनही बंदच! काय दडलंय या खोल्यांत? सत्य समोर आलं तर इतिहास बदलेल?
- New Business Idea: केवळ 50 हजार गुंतवणूक, कमी काम, नफा जास्त… ‘हे’ व्यवसाय आहेत खरे रत्न
- शेतकऱ्यांनो! पीक फेरपालट करून जमीनीचा पोत सुधरवा अन् उत्पादनात भरघोस वाढ करा; कृषी खात्याचा सल्ला
- राहुरीत पैसे चोरणाऱ्या सराईत टोळींचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे लावला शोध, सापळा रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या
- श्रीरामपुरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत,महावितरणचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? तब्बल २८ तासांनी वीजपुरवठा केला सुरळीत