जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला.

पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, भाजप हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. ते घाबरले आहेत.

मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. त्यामुळे ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभेसाठी प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, तसा प्रस्ताव आलेला नाही. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर चर्चा चालू आहे.
त्यांच्याकडे जायचे कशासाठी? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे? अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
- ‘ह्या’ झाडांची घराजवळ लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो !
- निसर्गाचा चमत्कार! ‘हे’ फूल 100 वर्षांत फक्त एकदाच उमलते, तुम्ही ऐकलंय का या दुर्मिळ फुलाचं नाव?
- शुक्राच्या प्रभावामुळे कायम आकर्षक दिसतात ‘या’ जन्मतारखेचे लोक, अभिनेता अनिल कपूरच्या चिरतरुण व्यक्तिमत्वामागेही हेच रहस्य!
- गंगा, यमुना की गोदावरी…, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? वाचा या नद्यांचे वैशिष्ट्य आणि धार्मिक महत्व!
- 30 नॉट्स वेग, 250 नौदल कर्मचारी आणि…; भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली सर्वात शक्तिशाली ‘INS Tamal’ युद्धनौका!