नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मात्र दुसरीकडे राहुल गांधी नाराज असल्याचे देखील समजते.

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे.
राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याची माहिती होती. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करणार होते, मात्र ते तिथंही आले नव्हते.
- कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…IPL 2025 आधीच MS Dhoni चर्चेत
- लाडक्या बहिणींसाठी अखेर ती गुड न्यूज आलीच, ‘या’ तारखेला दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात येणार, 3,000 की 4,200?
- Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…
- 400Km मायलेज, 360-डिग्री कॅमेरा आणि AI सपोर्ट – Hyundai Venue EV बद्दल हे तुम्हाला माहीत आहे का
- Volvo ES90 EV : 700 किमी रेंजसोबत BMW आणि Mercedes ला टक्कर देणारी इलेक्ट्रिक सेडान आली !