अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- ‘या’ 5 गोष्टी कधीच कुणालाही दान करू नका; देवी लक्ष्मीचा कोप ओढावून घ्याल!
- स्पीडबोटने जेएनपीए ते गेटवे अवघ्या २५ मिनिटांत पोहोचता येणार, मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे स्पीडबोट सेवा रखडली
- Personality Test: नखांच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसं ओळखायचं? येथे मिळेल संपूर्ण माहिती
- Name Astrology: तुमचं नाव M अक्षराने सुरू होतंय का? तर मग तुमच्या स्वभावाचे रहस्य जरूर वाचा
- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार, मोरवाडी धरणाबाबत १८ जूनला मंत्रालयात बैठक- आमदार खताळ