कर्जत : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मंत्र्यांचे दुष्काळी दौरे सुरु झाले आहेत . पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड या तालुक्यात दुष्काळी दौरा केला.
‘दुष्काळात कोणत्याही प्रकारे उपायोजना करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही. पिण्याचे पाणी, तसेच पशूधन वाचवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. टंचाईची स्थिती असली, तरी काळजी करू नका,’ असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.

श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण, नगर तालुक्यातील वाळकी, कर्जत; तसेच जामखेड तालुक्यातील हाळगाव पिंपरखेड नागलवाडी व कोकणगाव येथील चारा छावण्यांना शिंदे यांनी भेटी दिल्या.
शिंदे यांनी छावणीतील जनावरांची माहिती संबंधित शेतकऱ्यांकडून घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या ठिकाणी चारा कशा पद्धतीने उपलब्ध होतो, पाण्याचे टँकर किती येतात, याची माहितीसुद्धा त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून घेतली.
शिंदे म्हणाले, ‘सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात चाराटंचाई हा विषय महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रकारे चारा कमी पडू दिला जाणार नाही.’
‘सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. पशूधन वाचवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ह्या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचंही नाव आहे का ? पहा….
- चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी
- ग्रो मोअर कंपनी घोटाळ्यातील मेन सुत्रधाराकडून PSI आणि तीन अंमलदारांनी उकळले १ कोटी ५० लाख रूपये, चौघांनाही सेवेतून केले निलंबीत
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात २६० क्विंटल फळांची आवक, डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव
- नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीची सखोल चौकशी करू, गुंतवणूकदारांनी तक्रारी करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन