कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते व कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. टी. धुमाळ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी वरील मागणी केली.
पवार म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील ५२ गावे डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. याचबरोबर भोसे खिंड बोगद्यातून पावसाळ्यात १.२ टीएमसी अतिरिक्त पाणी सीना धरणात सोडले जाते.
गेल्या काही वर्षांपासून कर्जत-जामखेड तालुक्याचा बहुतेक भाग दुष्काळात होरपळत आहे. त्यातच कुकडी डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांसह शेवटच्या भागातील गावांना सिंचनाचे पाणी वितरिकांमधून योग्य त्या दाबाने व पुरेसे मिळत नाही.
पाणी योग्य त्या दाबाने व हक्काचे पुरेसे पाणी समन्यायी पद्धतीने शेतीपर्यंत पोचविण्यासाठी व वितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्याने तत्परतेने पावले उचलावीत असे ते म्हणाले.
- मार्चमध्ये म्हाडाची बहुप्रतिक्षित घरांची सोडत; मुंबई-पुण्यात ४ हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार
- आठवा वेतन आयोग : फिटमेंट फॅक्टरवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, बेसिक सॅलरीत मोठी वाढ होण्याची शक्यता
- मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर! वाढती गर्दी पाहता ‘ही’ वंदे भारत ट्रेन आता २० डब्यांसह धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय
- Sierra EV सोबत भारतात लाँच होणार 4 नव्या इलेक्ट्रिक कार; कोणती EV तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ?
- नगर-दौंड रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण; १२० किमी वेगाने धावणार गाड्या













