अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.
पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.
- राहुरी कृषी विद्यापीठाने दाखल केलेला १ कोटी रूपयांचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला
- लाखो नाही कोटींमध्ये मिळते ‘रोलेक्स’ घड्याळ, असं काय खास असतं या घड्याळमध्ये? जाणून घ्या रोलेक्सची वैशिष्ट्ये!
- 108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील ॲम्बुलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी.
- ‘ही’ आहेत देशातील टॉप 4 MBA कॉलेज ! इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट होणार
- स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही ‘या’ गावात कधीही झालं नाही मतदान; जाणून घ्या येथील लोकशाहीची अनोखी पद्धत!