भेळ विक्रेत्याचा मुलगा झाला आरटीओ!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा जवळील दिघोळ गावचे सुपुत्र रमेश सावंत यांची आरटीओ म्हणून नुकतीच निवड झाली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवले आहे.

येथील रहिवाशी छगन सावंत यांनी गावात कावडीने पाणी  वाहिले नंतर शेव चिवडा व भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याला अशोक सावंत यांच्या मोठ्या मुलाने साथ दिली.

हळूहळू हा व्यवसाय भरभराटीला आला त्यातच त्यांचे सुपुत्र रमेश सावंत यांनी शिक्षण घेत असताना त्यांनी आपला भाऊ वडील यांच्या कष्टाचं चीज करून

परीक्षेत यश मिळवले, नुकतीच त्यांची आरटीओ या पदावर निवड झाली असल्याने दिघोळ या गावांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe