संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला.
त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते.

त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले.
अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला आहे. पूर्वीच्या तुलनेत विखे पिता-पुत्रांचा संगमनेरमधील वावर अधिक वाढला असूूून त्याला आक्रमकतेचीही जोड मिळाली आहे. अंभोरे पेेेेयजल योजनेचे भूमिपूजन थोरात आणि विखे यांनी एकापाठोपाठ वेगवेगळ्या वेळी केले.
सरपंच खेमनर म्हणाले, ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार थोरात यांनी पेयजल योजनेसाठी पाठपुरावा केला. याकामी इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही पुढाकार घेतला. योजनेशी संबंध नसताना विखे उद्घाटनासाठी आले.
त्या कार्यक्रमात अंभोऱ्याचे कमी व बाहेरगावचेच नागरिक जास्त होते. योजना मंजूर झाली तेव्हा विखे सत्तेत नव्हते. आता ते युती सरकारचे गोडवे गात असले, तरी दोन महिन्यांपूर्वी भाजपचे वाभाडे काढत होते. योजनेचे काम थोरात यांनी मार्गी लावले, असे खेमनर म्हणाले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अमळनेर – बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण, उद्घाटनाचा मुहूर्त पण ठरला
- मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ महिलांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत, योजनेच्या अटी काय आहेत?
- दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ
- आधार कार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! आता WhatsApp वर डाउनलोड करा आधार, UIDAI ची नवी सुविधा
- नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांना दिलासा ! जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर स्प्लेंडर, शाईन, प्लेटिना कोणती बाईक किती स्वस्त होणार ? पहा…