संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला.
त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते.

त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले.
अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला आहे. पूर्वीच्या तुलनेत विखे पिता-पुत्रांचा संगमनेरमधील वावर अधिक वाढला असूूून त्याला आक्रमकतेचीही जोड मिळाली आहे. अंभोरे पेेेेयजल योजनेचे भूमिपूजन थोरात आणि विखे यांनी एकापाठोपाठ वेगवेगळ्या वेळी केले.
सरपंच खेमनर म्हणाले, ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार थोरात यांनी पेयजल योजनेसाठी पाठपुरावा केला. याकामी इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही पुढाकार घेतला. योजनेशी संबंध नसताना विखे उद्घाटनासाठी आले.
त्या कार्यक्रमात अंभोऱ्याचे कमी व बाहेरगावचेच नागरिक जास्त होते. योजना मंजूर झाली तेव्हा विखे सत्तेत नव्हते. आता ते युती सरकारचे गोडवे गात असले, तरी दोन महिन्यांपूर्वी भाजपचे वाभाडे काढत होते. योजनेचे काम थोरात यांनी मार्गी लावले, असे खेमनर म्हणाले.
- शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
- सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण
- एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळणार डबल बोनस
- पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार लखपती ! 5 वर्षात मिळणार 5 लाखांचे व्याज, कोणाला करता येणार गुंतवणूक?













