संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला.
त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते.

त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले.
अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला आहे. पूर्वीच्या तुलनेत विखे पिता-पुत्रांचा संगमनेरमधील वावर अधिक वाढला असूूून त्याला आक्रमकतेचीही जोड मिळाली आहे. अंभोरे पेेेेयजल योजनेचे भूमिपूजन थोरात आणि विखे यांनी एकापाठोपाठ वेगवेगळ्या वेळी केले.
सरपंच खेमनर म्हणाले, ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार थोरात यांनी पेयजल योजनेसाठी पाठपुरावा केला. याकामी इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही पुढाकार घेतला. योजनेशी संबंध नसताना विखे उद्घाटनासाठी आले.
त्या कार्यक्रमात अंभोऱ्याचे कमी व बाहेरगावचेच नागरिक जास्त होते. योजना मंजूर झाली तेव्हा विखे सत्तेत नव्हते. आता ते युती सरकारचे गोडवे गात असले, तरी दोन महिन्यांपूर्वी भाजपचे वाभाडे काढत होते. योजनेचे काम थोरात यांनी मार्गी लावले, असे खेमनर म्हणाले.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख