कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.
मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला.

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.
गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.
या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते.
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबा मंजूर
- दुष्काळात तेरावा महिना ! आता ‘या’ कारणामुळे सोयाबीनचे दर गडगडण्याची भीती
- रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ रेशनकार्ड धारकांना साखरेचा लाभ मिळणार, वाचा सविस्तर
- शेतकरी कर्जमाफी बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘ही’ महत्वाची अट पूर्ण केल्यावरच मिळणार कर्जमाफीचा लाभ
- शेवगा लागवडीतून विक्रमी उत्पादन मिळवायचय ? शेवग्याच्या ‘या’ 2 जातीची लागवड करा
- राज्यातील 29 महापालिका निवडणुकांआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट, महिला व बालविकास विभागाची तयारी













