कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.
मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला.

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.
गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.
या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते.
- Post Office च्या ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक सुरु करा, 60 महिन्यांनी होणार 7,00,000 रुपयांची कमाई !
- नाग पंचमी 2025 : शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ खास 5 वस्तु, मिळेल असंख्य लाभ!
- सौंदर्यात अभिनेत्रींनाही मागे टाकणाऱ्या सारा तेंडुलकरचं ब्युटी सिक्रेट उघड!’या’ उपायाने तुम्हालाही मिळू शकते ग्लोइंग स्कीन
- मॅकडोनाल्ड्सच्या वेट्रेसपासून करोडपती ‘तुलसी’ पर्यंतचा प्रवास, स्मृती इराणी यांची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
- एका मिसाइलची किंमत 5.38 अब्ज रुपये?, वाचा जगातील सर्वात महागड्या शस्त्रांची यादी!
- इंग्लंड-विरुद्ध मालिकेत चर्चेत आला 50 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड, आजपर्यंत कुणीही मोडू शकला नाही ‘या’ खेळाडूचा विक्रम!