कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.
मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला.

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.
गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.
या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते.
- 12 वर्ष एकाच घरात राहिल्यास ते घर भाडेकरू च्या मालकीचे होते का? सर्वोच्च न्यायालयाने दिला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम ! आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही, संपूर्ण प्रकरण काय आहे?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता दूध काढण्याच्या मशीनसाठी मिळणार इतकं अनुदान, वाचा सविस्तर
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार नवीन Railway मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले पूर्ण, 90 मिनिटांचा वेळ वाचणार
- महाराष्ट्रातील हवामानात उच्च उत्पादन देणाऱ्या कलिंगडच्या टॉप 5 जाती ! 2025-2026 मध्ये लागवडीसाठी उपयुक्त
- पुण्यातील दुसऱ्या Ring Road प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! ‘या’ ७ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार बांधकाम, वाचा सविस्तर