कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.
मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला.

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.
गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.
या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी
- Dividend Stock: वैद्यकीय क्षेत्रातील ‘ही’ कंपनी देणार मोठा डिव्हिडंड! तुमच्याकडे आहेत का शेअर्स? नोट करा रेकॉर्ड डेट