कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे.
मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावला.

शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ज्या गांधी नेहरू घराण्याने देशासाठी बलिदान दिले, त्याग केला. त्यांना या देशासाठी काय केले, विचारायचे धाडस मोदी कसे करू शकतात? काँग्रेसच्या आजपर्यंतच्या नेतृत्वाने देशात विविध विकासयोजना राबवल्या व आधुनिक क्रांतीचा पाया रोवला. त्यांचा त्याग देश कसा विसरेल? असा सवाल खासदार शरद पवार यांनी या वेळी विचारला.
गांधी-नेहरूंनी इतिहास घडवल्यानंतर भुगोल तयार झाला. त्यांंच्या कर्तृत्वावर मोदींनी शंका घेणे हे योग्य नाही. या देशासाठी मोदींचा त्याग काय आहे? असा सवाल उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींची सवय असल्याची टीका खा. शरद पवार यांनी केली.
या वेळी उमेदवार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते.
- Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या ‘आग्रा’ मोहिमेपासून तर आग्र्यावरून सुटकेपर्यंत अहिल्यानगरमधील नेवाशाची होती महत्वपूर्ण भूमिका
- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याचा महाराष्ट्रभर बोलबाला! यंदा १ कोटी ८४ लाखांचं विक्रमी उत्पन्न
- Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या सुपुत्राची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४ संघात निवड
- संत शेख महंमद मंदिराचा वाद चिघळला, वक्फ बोर्डाची नोंदणी रद्द होईपर्यंत चर्चा न करण्याचा आंदोलकांनी घेतला आक्रमक पवित्रा
- गुड न्यूज ! महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग, येत्या 30 दिवसात तयार होणार DPR, कोण कोणत्या शहरांमधून जाणार मार्ग ? पहा….
- वाईट काळ संपला ! 21 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार ! शुभ योगामुळे मिळणार जबरदस्त यश