श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. थोरल्या मुलाचे लग्न २१ तारखेला होते. लग्नाला अवघे दहा दिवस उरले असताना त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !