संगमनेर :- बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरास संगमनेर तालुक्यातील नांदुरी येथे घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१७ रा. नांदुरी दुमाला) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राज्यात आज बारावीचा निकाल जाहिर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परिक्षा दिली होती. बारावीत नापास झाल्याने सौरभला नैराश्य आले.
त्याने नांदुरी येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी सौरभला बाहेर काढून घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
- नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
- आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं
- फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…
- मोठी बातमी ! पुण्यातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर येणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा













