अहमदनगर :- भाजपचे सुजय (दादा) विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम (भय्या) जगताप यांच्यात झालेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आता तर निकालाच्या दोन दिवस आधीच दादा आणि भय्या यांच्यावर लाखो रुपयांचा सट्टा लागला आहे. दादा आणि भय्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच.

शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
मात्र, तोपर्यंत जिल्हाभरातील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निकालासाठी अवघे काही तास उरलेले आहेत.
बुधवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. गावागावात, चौकाचौकात, कॉलेज कट्टे एवढेच नाही, तर घरोघरी निकालावर चर्चा झडत आहेत.
अनेकांनी पैंज लावलेली आहे. कुणी पार्टी देण्याची, तर कुणी रोख रक्कम देण्याची पैंज लावलेली आहे. शेवटचे दोन दिवस दोन्ही उमेदवारांवर बुकींकडे लाखो रुपयांचा सट्टा लागलेला आहे.
तरुण मतदार, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, राजकारणाची आवड असणारे, कामगार, नोकरदार असे अनेकजण या सट्ट्याला बळी पडले आहेत. एक हजार रुपयांपासून, तर एक लाख रुपयांपर्यंत हा सट्टा लावण्यात आला आहे.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?