अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती.
डॉ. सुजय विखे म्हणाले, या मतमोजणीतील आघाडीसाठी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.
विखे यांनी ही जागा काँग्रेससाठी सोडण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार यांनी विखे यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी करण्याची अट घातली
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राधाकृष्ण विखे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. या सर्व घडामोडीनंंतर डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बाळासाहेब थोरात यांनीही विखेंविरोधात जोरदार मोहीम राबविली होती. त्यामुळेच मतमोजणीतील आघाडीनंतर डॉ. सुजय विखे यांनी अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













