पारनेर :- पवार साहेबांचे ऐकणारे पाहिजेत, म्हणून विखे यांना विरोध करायचा, हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे.
विखे हे कधीच आपल्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, हे पवार साहेबांना माहीत असल्याने त्यांनी या निवडणुकीत आपल्याला विरोध करण्याचे धोरण घेतले.

त्यांना बस म्हटले की बस व उठ म्हटले की उठणारा खासदार पाहिजे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा, म्हसे, देविभोयरे येथे विखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन मार्गदर्शन केले. निघोज येथील बैठकीत ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार नंदकुमार झावरे, शिवाजी जाधव, जि. प. सदस्या पुष्पा वराळ, दिनेश बाबर, सचिन पाटील, बबुशा वरखडे, शिवाजी डेरे, रंगनाथ वराळ, किसन सुपेकर, बाबाजी लंके, रामदास रसाळ, गोरख ढवण, प्रकाश पांढरकर आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, आपण पवार साहेबांना बधत नाही म्हणून उमेदवारीला विरोध करण्यात आला. मात्र गेली तीन वर्षे सुजय विखे यांनी मतदारसंघात मेळावे, आरोग्य शिबिर घेत जनतेचे प्रश्न सोडवले.
ही उमेदवारी जनतेची आहे. पुण्याच्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी आपले दक्षिणेचे पाणी पळवले. एकीकडे राज्यात सर्वांना धरणाचे समान पाणी मिळावे,
हे धोरण घ्यायचे व दुसरीकडे मात्र पुण्यातील पाणी आपल्याच भागातील लोकांना देण्याचा दुटप्पीपणा पवारांना कसा चालतो, हा प्रश्न विखे यांनी विचारला.
- भारतात पहिली कार नेमकी कधी आणि कुणी आणली…काय होती तिची किंमत?, 90% लोकांना माहीत नसेल याचा खरा इतिहास!
- Ladki Bahin Yojana | जुलैचा हफ्ता जमा होण्याआधीच फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा चर्चेत
- नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी
- ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 11 ऑगस्ट 2025 नंतर ह्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?