नवी दिल्ली – देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली.
संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि अर्थिक संकटाला तोंड आहे.अडचणीवर मात करून शेतकर्याना कांद्याचे उत्पादन हाती आले असताना न मिळणारा भाव आणि निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे शेतकर्यांवर संकटात सापडला आहे.
या प्रश्नावर आज खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले,याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या उत्पादीत केलेल्या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली तर शेतकर्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल.सरकारने मागील काही दिवसांपासून निर्यात अनुदान बंद केल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळेच निर्यात अनुदानाची मुदत सहा महीने वाढविल्यास शेतकर्याना त्याचा निश्चितच लाभ होईल याबाबत केद्र सरकारने गांभीर्याने विचार करून निर्णय करावा आशी मागणी खा.डाॅ.विखे पाटील यांनी केली.
- डी मार्टपेक्षा स्वस्त सामान कुठं मिळत ? हे आहेत टॉप पाच पर्याय
- महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! 1 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोषण आहारात मोठा घोटाळा, संभाजी ब्रिगेडने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड!
- महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षणाधिकारी यांच्याकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी
- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! 1 जुलै 2025 पासून ‘या’ प्रवाशांना मिळणार तिकीट दरात 15% सवलत