औरंगाबाद : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता.
हा प्रकार म्हणजे ‘दिराशी भांडण अन् नवऱ्याला घटस्फोट’, असा असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.

भाजपा प्रवेशानंतर पाटील यांनी केलेली राष्ट्रवादीवरील टीका अनाकलनीय असल्याचेही त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात चाचपणी सुरू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी शहरात आलेल्या खासदार सुळे यांनी मंगळवारी (दि.११) पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा समाचार घेतला.
यावेळी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, प्रदेश सदस्य कदीर मौलाना, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, जिल्हा शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, नगरसेविका अंकिता विभुते, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
- Tata च्या ‘या’ शेअर्सने 30 दिवसात गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! मिळालेत 60% रिटर्न, आता Stock Split ची मोठी घोषणा
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !
- शेअर मार्केटमधील ‘ही’ आयटी कंपनी देणार 5.75 रुपयांचा Dividend ! रेकॉर्ड डेट कोणती?
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पण वाढला! वाचा डिटेल्स
- ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! 100x झूम आणि 50 MP कॅमेरा असणारा ‘हा’ विवोचा स्मार्टफोन 10,000 रुपये स्वस्तात मिळणार