राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- राज्यातील 29 महापालिका निवडणुकांआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट, महिला व बालविकास विभागाची तयारी
- टोल नाक्यापासून इतक्या लांब राहणाऱ्या वाहनचालकांना Toll भरावा लागणार नाही ! शासनाचे नवे नियम काय सांगतात?
- 1 लाख टाकलेत 60000000 रुपये कमावलेत….; 5 वर्षातच बनवलं करोडपती, शेअर मार्केटमधील ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरला भाग्यशाली
- फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक ! आता फक्त २०० रुपयात होणार जमीन मोजणी, नियमांत झाला मोठा बदल
- आदिवासींच्या नावावर असणारी जमीन विकता येते का ? तज्ञ सांगतात….













