राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- पुणे रिंग रोड : आता ‘या’ 74 गावांचा पण प्रकल्पात समावेश केला जाणार, समोर आली मोठी अपडेट
- 12 वर्ष एकाच घरात राहिल्यास ते घर भाडेकरू च्या मालकीचे होते का? सर्वोच्च न्यायालयाने दिला आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम ! आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही, संपूर्ण प्रकरण काय आहे?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता दूध काढण्याच्या मशीनसाठी मिळणार इतकं अनुदान, वाचा सविस्तर
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार नवीन Railway मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले पूर्ण, 90 मिनिटांचा वेळ वाचणार