राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- सीना नदी घेणार मोकळा श्वास!, नदीत सोडला जाणारा मैला पाईपद्वारे जाणार एसटीपी प्रकल्पात तर प्रकिया केलेले पाणी वापरले जाणार शेतीसाठी
- शेतकऱ्यांसाठी मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं काटेकोर नियोजन, यंदा महिनाभर अगोदर निळवंडे धरणातून सोडलं आवर्तन
- शालेय विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते ? भारतात कधीपासून रविवारची सुट्टी सुरू झालीये ? वाचा सविस्तर…
- Agri Business Idea: शेती करता करता महिन्याला कमवा 50 हजार! 10 हजार भांडवलात सुरू होणारे ‘हे’ 7 व्यवसाय देतील हमखास नफा
- राज्यातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन ब्रॉडगेज Railway मार्ग ! 568.86 कोटींची निविदा मंजूर, 30 महिन्यात पूर्ण होणार काम