राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- Explained : विखे पुन्हा व्हाईट वाॅश देतील का? गट व गण वाढल्याने राहात्यात चुरस
- महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधील अंतर 135 किलोमीटरने कमी होणार ! येत्या 30 दिवसात मंजूर होणार 1,600 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प
- जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी अपडेट
- महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
- मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल ! 15 जूनपासून लागू होणार नवीन टाईम टेबल