अहमदनगरची संपूर्ण बाजारपेठ बंद नाही !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अहमदनगर शहरातील एका भागातील व्यापाऱयांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण बाजारपेठेशी संबंधित नाही.

कापड बाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली, गंज बाजार इत्यादी प्रमुख बाजारपेठ नेहमीप्रमाणेच सकाळी ९ ते सांयकाळी ५ ह्या वेळेत सुरू राहणार आहे.

या भागातील वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व सर्व व्यापारी असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता योग्य ती दक्षता घेऊन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, असे आवाहनही प्रतिष्ठान व व्यापारी संघटनांतर्फे करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe