राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसने बुधवारी महाराष्ट्रातील आणखी २ जणांचा बळी घेतला. यामुळे राज्यातील बळींचा आकडा फुगून १२ वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ३३, तर संपूर्ण देशात ३८६ नवे रुग्ण आढळलेत.

यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३३५ वर पोहोचला असून, देशाचा आकडाही तब्बल १,८७५ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने झपाट्याने वाढणाऱ्या या आकड्यासाठी ‘तबलिगी जमात’च्या दिल्लीतील कार्यक्रमाला जबाबदार धरले आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून १८६, तर राज्यातील आकडा ३३५ वर पोहोचला आहे’, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नंतर याची पुष्टी केली. ‘राज्यातील ५,३४३ नागरिकांना उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. हे सर्व जण १६२ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वधारण्याची चिन्हे आहेत.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe