अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी झाली असून राठोड यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले. 

रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिल राठोड यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतल्याने तालुका शिवसेना व श्रीसंत सावता माळी युवक संघाच्या वतीने वांबोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयसिंह पाटील म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात करून सलग पंचवीस वर्षे आमदारकी व राज्याचे मंत्रिपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली होती.

राहुरी तालुका शिवसेना उपप्रमुख ईश्वर कुसमुडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेचा आधारस्तंभ असलेले अनिल राठोड हे त्यांच्या कार्यातून कायम स्मरणात राहतील.श्रीसंत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे म्हणाले, अनिल राठोड यांच्या निधनाने नगर शिवसेनेचा आधारस्तंभ हरपला.

यावेळी वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे, श्रीसंत सावता माळी युवक संघ तालुकाध्यक्ष दीपक साखरे, वांबोरी शहर शिवसेना अध्यक्ष एकनाथ गवते, यश पटारे, नासिर कोतवाल, रंंगनाथ जाधव, रामा दुधाडे उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe