नेवासे :- पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा प्रस्ताव केवळ श्रेय मिळू नये म्हणून मागील सरकारने बासनात गुंडाळला. पण फडणवीस यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला.
निळवंड्याचा प्रश्न त्यांनी एक तासात मंजूर केला. विदर्भातून आलेल्या नेत्याला जे समजले, ते सत्ता गेली तरी आमच्या जुन्या नेत्यांना समजले नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना मारला. विखेंनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कौतुक केले,

तर काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. नेवासे येथील ४ कोटींच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम विखेंच्या नागरी सत्कारात झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता बर्डे होत्या,
तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नितीन दिनकर, नितीन जगताप उपस्थित होते. घरकुलांसाठी जे ४०-४० हजारांचे तीन हप्ते दिले जात,
ते बदलून आता पहिलाच हप्ता थेट १ लाखाचा देण्याची घोषणा विखे यांनी केली. नेवासे तीर्थक्षेत्रासाठी प्रलंबित असलेल्या प्राधिकरणाचा प्रस्ताव मार्गी लावू, असे ते म्हणाले.
मित्र प्रदेशाध्यक्ष झाले, पण जुन्या चेहऱ्यांसह पक्ष कसा वाढणार? मतदारसंघात २५ हजारांनी मागे असल्याने मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे, तरी त्यांना शुभेच्छा. विधानसभेला जिल्ह्यात १२-० असाच निकाल लागेल.” राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री.
- 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची
- काय सांगता! फक्त 60 मिनिटात पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला याल, ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन
- शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारच्या तिजोरीत पैसाचं उरला नाही ! महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे झाले बंद, पहा…
- नवीन वर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी, ‘या’ 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्राच हवामान कस राहणार?
- नवीन वर्षाआधी गोवा आणि राजस्थान दर्शनाला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय! महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन