Government Insurance Schemes : फक्त 456 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा, बघा केंद्र सरकारची ‘ही’ खास योजना कोणती?

Published on -

Government Insurance Schemes : केंद्र सरकाद्वारे गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, यामधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ही योजना खास गरीब लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब व्यक्ती 4 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळवू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे? आणि ती कशी काम करते. चला जाणून घेऊया.

केंद्र सरकारने गरीब लोकांसाठी पेन्शन योजना तसेच विमा योजना सुरू केल्या आहेत. आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी लोकांना विमा संरक्षण देण्यासाठी दोन योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचा समावेश आहे. याद्वारे तुम्ही नाममात्र प्रीमियम भरून 4 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळवू शकता. केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तीला 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.

विमा संरक्षणादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या अवलंबितांना 2 लाख रुपयांचा विमा दिला जातो. यासाठी, विमाधारकाला दरवर्षी 436 रुपये प्रीमियम भरावा लागतो आणि एका वर्षासाठी (1 जून ते 31 मे पर्यंत) कव्हरेज मिळते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. याची सुरुवातही केंद्र सरकारने २०१५ मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू किंवा एकूण अपंगत्व विमा आणि 1 लाख रुपयांचा आंशिक अपंगत्व विमा प्रदान केला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, विमाधारकाला वार्षिक 20 रुपये प्रीमियम भरावा लागतो. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचा प्रीमियम देखील एका वर्षासाठी वैध आहे (1 जून ते 31 मे पर्यंत). PMSBY च्या प्रीमियम बँकेच्या ऑटो डेबिटची सुविधा देखील प्रदान केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News