तारकपूर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह १ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास

अहिल्यानगर- तारकपूर परिसरातील एक घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे २८ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गौरव अल्फ्रेड गमरे (वय ३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, ह. रा. लोहगाव, पुणे) यांनी … Read more

पावसाळ्यात फूड पॉइजनिंग झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपचार! त्वरित मिळेल आराम

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो, पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आरोग्य तक्रारीही उगम पावतात. यामध्ये सर्वाधिक त्रासदायक ठरतो तो म्हणजे अन्नातून होणारी विषबाधा. एरव्ही जे अन्न आपण आनंदाने खातो, तेच पावसात थोडंसं खराब झालं की शरीराला घातक ठरू शकतं. यामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशा समस्या जाणवतात. जर तुम्हालाही नुकतंच असं … Read more

गरम तेल, वाफ किंवा चहा अंगावर सांडल्यास घाबरू नका! ‘या’ घरगुती उपायाने लगेच थांबेल जळजळ

घरात रोजच्या धावपळीत स्वयंपाक करताना कधी गरम तेल उडतं, तर कधी चहा किंवा वाफ हातावर पडते, त्यावेळी होणारी तीव्र जळजळ अक्षरश: रडवायला आणते. कित्येकदा आपण गोंधळून जातो काय करावं, कसं करावं? पण अशा प्रसंगी काही साधे, घरातच सहज करता येणारे उपाय तुमच्या वेदनेला तात्काळ आराम देऊ शकतात आणि पुढच्या त्रासापासून तुमचा बचावही करतात. थंड पाणी … Read more

कुत्रे, मांजरी, हत्ती…हे प्राणी नैसर्गिक आपत्तीचा इशारा आधीच कसा देतात? जाणून घ्या सत्य!

भूकंप किंवा त्सुनामीसारखी मोठी आपत्ती येण्याआधी प्राणी अस्वस्थ, भयभीत किंवा विचित्र वागू लागतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. 2004 साली आलेल्या त्सुनामीनंतर प्राण्यांच्या या विचित्र वर्तनावर वैज्ञानिकांचं लक्ष गेलं. लोकांना वाटलं हा केवळ योगायोग असेल, पण वैज्ञानिकांनी त्यामागे एक स्पष्ट कारण शोधलं. प्राणी माणसांपेक्षा अधिक तीव्र इंद्रियशक्तीच्या माध्यमातून निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांना आधीच ओळखतात. वैज्ञानिक … Read more

भारतीय ट्रकवर मागच्या बाजूला ‘Horn OK Please’ आणि ‘OK Tata’ का लिहिलं जातं?, वाचा यामागील भन्नाट कारण!

भारतीय रस्त्यांवरून प्रवास करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, ट्रकच्या मागच्या भागावर मोठ्या रंगीत अक्षरांत लिहिलेलं “हॉर्न ओके प्लीज” किंवा “ओके टाटा बाय बाय”. हे शब्द केवळ रंगीबेरंगी सजावटीचा भाग वाटू शकतात, पण खरंतर त्यांच्या मागे एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे, आणि त्यात लपलेलं आहे भारतीय रस्त्यांवरील संवादाचं एक खास रूप. ‘Horn OK … Read more

आगामी काळात जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही : आ. रोहित पवार

अहिल्यानगर : जामखेड येथील तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी … Read more

जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १०९ कोटी ; पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता

अहिल्यानगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्त शनिवारी, २ ऑगस्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतून शनिवारी, २ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात … Read more

टोमॅटोपाठोपाठ डाळिंब १४ तर संत्रा १२ हजार ; कांदा मात्र गडगडलेलाच अहिल्यानगर बाजार समितीत ४३४ क्विंटल फळांची आवक

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांच्या भावात वाढ झाली असून संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकीकडे सध्या फळांना चांगले भाव मिळत असताना दुसरीकडे कांद्याला मात्र कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. … Read more

जास्तीचा परतावा दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर ‘सुमोटो’

अहिल्यानगर : शेअर ट्रेडिंग कंपन्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपन्या ठेवीदारांकडून रक्कम घेतात आणि पोलिसांच्या तावडीत येण्याआधीच पळून जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अशा कंपन्यांचा शोध … Read more

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात घातले कुऱ्हाडीने घाव : संगमनेर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर : चारित्र्याच्या संशयावरून ६५ वर्षांच्या पतीने आपल्या ६० वर्षाच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण खंदारे (वय ६५) हे घारगाव येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवण … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आज रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने कोणत्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून सभागृहात मोठी माहिती ! नव्या वेतन आयोगाचे कामकाज कुठवर आलं ?

New Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी आहे. म्हणजेच लवकरच सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन … Read more

ऑगस्ट महिना ठरणार सुपर लकी!’या’ 5 मूलांकांवर सूर्यदेव व राहू करणार धन, यश आणि संधींचा वर्षाव

ऑगस्ट महिना सुरू होताच काही लोकांना जबरदस्त लाभ होणार आहेत. या महिन्यात काही निवडक मूलांक असणाऱ्या लोकांवर सूर्य आणि राहुचा विशेष आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे धनलाभ, पदोन्नती, गुंतवणुकीत नफा अशा अनेक शक्यता त्यांच्या दाराशी येऊन उभ्या आहेत. चला, पाहूया या कोणते आहेत हे भाग्यवान मूलांक. मूलांक 1 मूलांक 1 असलेले लोक म्हणजे जे लोक 1, … Read more

ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार

August Rule Change

August Rule Change : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. खरंतर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सगळीकडे अगदीच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. पण, एक ऑगस्ट 2025 पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या आणि यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याव्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे रेट सुद्धा … Read more

मृत्यूनंतर मालमत्तेचा खरा वारसदार कोण असतो?, नामनिर्देशित व्यक्ती की कायदेशीर वारस? वाचा कायदा काय सांगतो!

तुम्ही आयुष्यात मेहनतीने कमावलेली संपत्ती, बँकेतील ठेवी, विमा, गुंतवणूक यावर तुमचा हक्क असतोच, पण तुमच्या निधनानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. विशेषतः जेव्हा अचानक काही घडतं आणि कुटुंबाला कायदेशीर किचकट प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अशा वेळी “नामनिर्देशित व्यक्ती” म्हणजे नेमकं काय? ती तुमच्या मालमत्तेची मालकीण होते का? याबद्दल स्पष्ट माहिती असणं फार … Read more

पुणे – अहिल्यानगर – नागपूर दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! 3 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ स्थानकांवर थांबा

Pune Railway

Pune Railway : तीन ऑगस्ट पासून पुणे ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाकडून लवकरच एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रेल्वे कडून आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे ते मध्य प्रदेशातील रिवादरम्यान ही नवीन … Read more

भारतीयांसाठी सुवर्णसंधी! युके, अमेरिका, युएईसह 15 देशांचा व्हिसा मिळवा फक्त 1 रुपयांत; कसं ते जाणून घ्या

परदेशात जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुणाला लंडन पाहायचंय, कुणाला दुबईचं वैभव अनुभवायचंय, तर कुणाला ऑस्ट्रेलिया. पण प्रत्येक वेळेस त्या स्वप्नामध्ये एक अडथळा ठरत आला आहे, व्हिसा शुल्क! हजारो रुपयांचं हे शुल्क अनेक वेळा परवडत नाही आणि स्वप्न पुन्हा बॅगेत बंद होतं. पण आता एक मोठी बातमी आली आहे जी अनेक भारतीय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय. दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते … Read more