निवृत्तीनंतरचं आयुष्य सावरण्यासाठी आर्थिक सुरक्षेचा आधार आवश्यक असतो. रोजचा पगार थांबतो, पण गरजा मात्र तशाच राहतात, काही वेळा तर वाढतातसुद्धा. म्हणूनच, निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळावं अशी हमी असलेली योजना हवी असते, ज्यावर मनःशांतीने विसंबून राहता येईल. एलआयसीनं अशा गरजांसाठी ‘नवजीवन शांती’ ही एक विशेष योजना आणली आहे. ही योजना एकदाच गुंतवणूक करून दीर्घकाळ मासिक पेन्शन मिळवण्याची हमी देते, तीही आयुष्यभरासाठी.

‘नवजीवन शांती’ योजना
एलआयसीची ही योजना खास आहे, कारण यात तुम्ही फक्त एकदाच रक्कम भरता, आणि त्यानंतर नियमितपणे तुम्हाला पेन्शन मिळतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही सुरुवातीलाच 10 लाख रुपये गुंतवले, आणि काही वर्षांनी पेन्शन घेण्यास सुरुवात केली, तर मासिक 1 लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते. ही योजना त्यांच्या दृष्टीने उत्तम आहे, जे निवृत्तीच्या अगोदरच नियोजन करून आर्थिक स्थैर्य निर्माण करू इच्छितात.
योजनेसाठी अट
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वय 30 वर्षे असावं लागतं. जास्तीत जास्त तुम्ही 100 वर्षांच्या आत अर्ज करू शकता. 5 लाख रुपयांपासून सुरू होणारी गुंतवणूक 1 कोटीपर्यंत करता येते. त्यानुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनची सोय मिळते. उदाहरण द्यायचं झालं, तर 5 लाख रुपये गुंतवल्यास मासिक सुमारे 2,575 रुपये, तर वार्षिक अंदाजे 32,150 रुपये मिळू शकतात.
करमुक्त योजना
या योजनेत सर्वात आकर्षक बाब म्हणजे करसवलत. तुम्हाला परतावा म्हणून मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर लागू होत नाही. त्यामुळे हे उत्पन्न पूर्णपणे तुमचं राहतं. शिवाय, या योजनेत नॉमिनीची सुविधाही आहे, म्हणजेच तुमच्यानंतर तुमच्या प्रिय व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो.
अर्ज कुठे कराल?
ही योजना घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयाला भेट देऊ शकता, किंवा एलआयसीची अधिकृत वेबसाइट [https://licindia.in/](https://licindia.in/) यावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. एलआयसीच्या विश्वासार्हतेमुळे आणि खात्रीशीर परताव्यामुळे, ही योजना निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आणि सुसंस्कृत आयुष्याचा मजबूत आधार बनू शकते.