‘ही’ आहेत भारताची तीन महाशक्तिशाली शस्त्रे, ज्यांना पाहून चीन-पाकिस्तान काय तुर्कीसुद्धा घाबरतो!

Published on -

भारताच्या संरक्षण क्षेत्रात सध्या एक जबरदस्त क्रांती घडतेय. देश आता केवळ आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावले टाकत नाहीये, तर जागतिक पातळीवर आपली ताकदही ठासून दाखवत आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना तर सोडाच, पण आता तुर्कीसारखा देशही भारताच्या काही आधुनिक आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांकडे पाहून धास्तावलेला आहे. यामागचं कारण आहे रुद्रम, पिनाक आणि I-STAR हे ‘त्रिकुट’

रुद्रम क्षेपणास्त्र

ब्रह्मोसच्या यशानंतर भारताने रुद्रम क्षेपणास्त्र विकसित केलं . हे केवळ एखादं हवाई क्षेपणास्त्र नाही, तर शत्रूच्या आत खोलवर घुसून रेडिओ सिग्नल्स, रडार यंत्रणा आणि संप्रेषण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची जबरदस्त क्षमता असलेलं हायपरसोनिक शस्त्र आहे. रुद्रमचे तीन प्रकार भारताकडे आहेत, ज्यांची रेंज अनुक्रमे 200, 300 आणि 550 किलोमीटरपर्यंत जाते. यामुळे शत्रूचा तळ कुठेही असो, त्याला अचूकपणे लक्ष्य करून नष्ट करणं शक्य होतं.

पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट

याच बरोबर, डोंगराळ आणि सीमावर्ती भागांमध्ये पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरची भूमिका मोठी आहे. डीआरडीओच्या या संशोधनात भारताने स्वदेशी पातळीवर तयार केलेलं हे शस्त्र एकाचवेळी अनेक रॉकेट डागू शकतं. पिनाक मार्क-4 या नवीन आवृत्तीची रेंज तब्बल 300 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. 250 किलो वॉरहेडसह शत्रूच्या तळांवर तुफान हल्ला करण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे आता पाकिस्तान किंवा चीनच्या सीमांवर हल्ला करण्यासाठी विमानं उडवण्याची गरजही नाह, पिनाक एकटंच पुरेसं आहे.

I-STAR प्रकल्प

शक्तिमान क्षेपणास्त्रांबरोबरच भारत आता देखरेख आणि गुप्तचर क्षमतेतही आत्मनिर्भर बनतोय. DRDOचा I-STAR प्रकल्प म्हणजे याचं उत्तम उदाहरण. Intelligence, Surveillance, Target Acquisition and Reconnaissance या चार अंगांनी सुसज्ज असलेल्या या प्रकल्पांतर्गत भारत आपली स्वतःची हवाई देखरेख यंत्रणा विकसित करतोय. जवळपास 10,000 कोटी रुपयांच्या या योजनेनुसार काही विमानं खरेदी करून त्यात स्वदेशी रडार यंत्रणा बसवली जाणार आहेत. ही विमाने दिवसरात्र, कोणत्याही हवामानात कार्य करू शकतात आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवतात.

या तिन्ही शस्त्रांमुळे भारताची लष्करी क्षमता अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे. चीन आणि पाकिस्तानने तर याची दखल घेतलीच आहे, पण या क्षेत्रात आघाडी घेण्याचं स्वप्न बाळगणारा तुर्कीही आता भारताच्या या शस्त्रास्त्रांमुळे अस्वस्थ झाला आहे. आर्मेनियासारख्या देशांना भारत पिनाका पुरवतोय, याचा अर्थ भारत आता शस्त्र निर्यातीतही एक विश्वासार्ह नाव बनतोय.

या सगळ्या घडामोडी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला केवळ बळ देत नाहीत, तर भारताच्या जागतिक सामर्थ्याचंही प्रतीक बनत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!