Maharashtra New Factory : महाराष्ट्रातील विदर्भात एक मोठा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. राज्यात एक नवीन हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे. या नव्या फॅक्टरीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
खरंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. दरम्यान हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आता उपराजधानी नागपूरमध्ये 8000 कोटी रुपयांचा नवा प्रकल्प उभा केला जाणार आहे. हा प्रकल्प मॅक्स एरोस्पेस कडून विकसित होणार आहे.

हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार
उपराजधानी नागपूर येथे 8 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारला जाणार आहे. महत्वाची बाब अशी की, या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागादरम्यान सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, यामुळे नागपूरच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजधानी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा करार संपन्न झाला आहे. यावेळी या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव, औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी आणि उद्योग विभाग यांच्यात हा करार झाला.
कधी सुरू होणार प्रकल्प ?
मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात 2026 पासून सुरू होणार आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात जवळपास दोन हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. या नव्या फॅक्टरी मुळे राज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 2000 रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पांतर्गत पुढील आठ वर्षात सुमारे 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आणि ही गुंतवणूक विकसित महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हेलिकॉप्टर कस्टमायझेशन आणि संपूर्ण उत्पादनासाठी समर्पित हा महाराष्ट्रातील पहिला वहिला प्रकल्प राहणार आहे. या उपक्रमाद्वारे, महाराष्ट्र एरोस्पेस उत्पादनासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. नक्कीच हा प्रकल्प राज्याच्या एकात्मिक विकासात गेम चेंजर प्रकल्प ठरेल.