वाईट काळ इतिहासात जमा होणार, 9 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

पुढील महिन्यात राशी चक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत. 09 जुलै रोजी नवग्रहातील एका ग्रहाचा उदय होईल आणि त्याच दिवसापासून काही लोकांच्या आयुष्यातील वाईट काळ इतिहासात जमा होणार आहे.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील जेवढे पण ग्रह आहेत त्या ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. ग्रहांचे फक्त राशी गोचरच होते असे नाही तर ग्रह अस्त आणि उदय सुद्धा होतात.

जेव्हा एखाद्या ग्रहाचा अस्त होतो किंवा एखाद्या ग्रहाचा उदय होतो तेव्हा याचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. गुरु ग्रहाचा सुद्धा अस्त आणि उदय होत असतो. पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात आता गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत विराजमान असून 9 जुलै 2025 रोजी भल्या पहाटे, पावणे पाच वाजेच्या सुमारास गुरु ग्रहाचा मिथुन राशीत उदय होणार आहे. दरम्यान, गुरू ग्रहाचा उदय झाल्यानंतर राशी चक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतो.

या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

तूळ : या राशीच्या व्यक्तींना गुरुचा उदय प्रगतीचे नवे मार्ग खुला करून देईल. या लोकांचा वाईट काळ आता इतिहासात जमा होईल असे आपण म्हणू शकतो. या लोकांना विविध क्षेत्रात चांगला लाभ मिळणार आहे. कायदा, लेखन, शिक्षण अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. या लोकांच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी आता दूर होणार असे दिसते. या लोकांच्या करिअरचा मार्ग सुद्धा सुकर होईल. या लोकांची वाणी मधुर होईल. नवे नाते दृढ होण्याची शक्यता आहे. सोबतच गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो.

मकर : तूळ राशीच्या लोकांप्रमाणेच मकर राशीच्या लोकांना सुद्धा गुरु ग्रहाच्या या चालीमुळे मोठा लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता इतिहासात जमा होणार आहे. या लोकांचा गुरु उदयामुळे सुवर्णकाळ सुरू होईल असे आपण म्हणू शकतो. हा काळ भाग्यवृद्धीचा राहणार आहे. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे परिणामी जुन्या योजना यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भौतिक सुख, मालमत्ता खरेदी आणि नोकरीत बढतीचे योग आहेत. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. म्हणजेच सर्वच क्षेत्रासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे.

सिंह : या राशीच्या व्यक्तींनाही या काळात चांगले लाभ मिळणार आहेत. व्यवसायात फायदेशीर करार, समाजात सन्मान आणि विदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता संपणार आहे. नऊ जुलैपासून या राशीच्या लोकांचे नशीब पूर्णपणे बदलेल. या राशीच्या नोकरदारांना वेतनवाढ व पदोन्नतीचा लाभ होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!