भारतातील सगळ्यात उंच धबधबा महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात ! कुठून कस पोहचायचं ?

पावसाळ्यात पांढरा शुभ्र फेसाळणारा धबधबा पाहण्याची मजा काही औरच असते. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात एखादा प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी जाणार असाल तर तुम्ही देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा पाहायला जायला हवे. 

Published on -

Best Picnic Spot : महाराष्ट्र हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, सजलेला प्रदेश. छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीला लाभलेला भौगोलिक प्रदेश खरच खूप पाहण्यासारखा आहे. येथील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू, मंदिरे, अभयारण्य, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य खरच पाहण्यासारखे आहे.

दरम्यान जर तुम्हालाही पिकनिकला जायचे असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरंतर आज आपण भारतातील सगळ्यात उंच धबधब्याची माहिती पाहणार आहोत. भारतातील सगळ्यात उंच धबधबा आपल्या महाराष्ट्रात आहे.

पावसाळ्यात हा धबधबा प्रवाहित होत असतो आणि म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा धबधबा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते.

दरम्यान जर तुम्हाला ही भारतातील सगळ्यात उंच धबधब्याचे हे विहंगमदृश्य आपल्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात या धबधब्याला भेट देण्याचा प्लॅन बनवू शकतात.

कुठे आहे भारतातील सगळ्यात उंच धबधबा 

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित असणारा भांबवली वजराई हा धबधबा देशातील सर्वाधिक उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. मिळालेल्या माहितीनुसार वजराई या देशातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्याची उंची 1840 कोटी इतकी आहे.

हा धबधबा सरळ एका उभ्या दगडावरून वाहतो. हा धबधबा म्हणजेच उरमोडी नदीचे उगमस्थान आहे. या धबधब्याच्या ठिकाणी उरमोडी नदीचे उगमस्थान असून हा अशा प्रकारचा धबधबा देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा असल्याने येथे अनेक पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने भेटी देतात.

एक सुंदर प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे. जर तुम्हीही साताऱ्याला गेलात तर हे विहंगम दृश्य पाहायला विसरू नका. महत्त्वाची बाब अशी की या धबधब्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर तुम्हाला कास पुष्प पठार सुद्धा पाहायला मिळणार आहे.

जर तुम्हाला या धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही भांबवली या गावापर्यंत गाडीने जाऊ शकतात. पण यापुढे जाण्यासाठी रस्ता नाही यामुळे तुम्हाला पायी जावे लागणार आहे.

भांबवली गावापासून साधारणता एक किलोमीटरचा पायी ट्रेक पूर्ण केल्यानंतर तुम्हाला धबधब्याचे अद्भुत असे दृश्य आपल्या नजरेत कैद करता येणार आहेत.

सकाळी आठ ते सायंकाळी 5:00 पर्यंत तुम्ही हा धबधबा पाहू शकता पण फारच मुसळधार पाऊस असेल तर येथे जाणे टाळावे असे आवाहन जाणकारांकडून केले जाते.

कस पोहचणार इथे

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सातारा शहरापासून भांबवली जवळपास 30 ते 35 किलोमीटर दूर आहे. तुम्हाला जर इथे जायचे असेल तर तुम्ही साताऱ्याहून कासला जाऊ शकतात मग कास वरून तांबी म्हणजे भांबवली येथे जाऊ शकतात. किंवा मग तुम्ही महाबळेश्वर ते तापोळा ते बामणोली ते कास आणि मग कासवरून भांबवली येथे जाऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!